धनगर समाजाच्या घोंगडी बैठकीस मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद

महाराष्ट्र राज्यातील धनगर समाजाची मागील ७० वर्षांपासून केंद्र व राज्य सरकारकडे अनुसूचित जमातीमध्ये धनगर समाजाला समाविष्ट करा म्हणून मागणी आहे. यासंदर्भात धाराशिव जिल्ह्यात गावोगावी घोंगडी बैठका होत असून, या माध्यमातून ३० नोव्हेंबरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरील मोर्चात सहभागी होण्याबाबत आवाहन केले जात आहे तरी या बैठकीला उत्तम प्रतिसाद मिळत असून 30 नोव्हेंबरला धनगर समाज मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे दिसून येत आहे
धनगर आणि धनगड हे एकच असल्याचे अनेक पुरावे देऊन ही केंद्र व राज्य सरकार धनगर व धनगड
पळ काढत असल्याचे येथील धनगर समाजांचे म्हणणे आहे. २०१४ च्या निवडणुकीपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्या कॅबिनेट बैठकीत धनगरांना आरक्षण देऊ, असा शब्द दिला होता. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सोलापूर येथील सभेत धनगरांना आरक्षण देण्याचा उल्लेख केला होता. मात्र, अद्याप कार्यवाही झालेली नाही. सरकारला याची आठवण करून देण्यासाठी ३० नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. या अनुषंगाने जिल्ह्यात गावोगावी धनगर समाजाकडून घोंगडी बैठका घेऊन आवाहन केले जात आहे.