ताज्या घडामोडी
रिपाई (खरात गट ) पक्षाच्या वतीने संविधान दिन साजरा!

जयनारायण दरक—-कळंब
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना संविधान तयार करण्यासाठी दोन वर्षे 11 महिने 18 दिवस इतका कालावधी लागला आणि ते सविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी संसदेमध्ये सादर केलेल्या नंतर मान्यता मिळाली म्हणून हा दिवस भारतीय संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.कळंब येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले यावेळी वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ नेते अरविंद खडके सर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) पक्षाचे धाराशिव जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत.लोक जनशक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ गायकवाड. रिपाई (ए)साखरे मामा, रिपाई (खरात)पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष महावीर गायकवाड, ज्येष्ठ नेते निवृत्ती हौसलमल,युवक तालुका अध्यक्ष बुभा वाघमारे, यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.