ताज्या घडामोडी

मराठा आरक्षणासाठी दहिफळच्या तरुणाने चिठ्ठी लिहून केली आत्महत्या

दहिफळ गावावर शोककळा पसरली.

 

दहिफळ प्रतिनिधी-योगराज पांचाळ

कळंब तालुक्यातील दहिफळ येथे दि ४ जानेवारी रोजी सायंकाळी सातच्या सुमारास रोहण राजेंद्र भातलवंडे या १९ वर्षाच्या तरुणाने चिठ्ठी लिहून गळफास घेतला आहे.
शेतातील बांधावर असलेल्या चिंचेच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली आहे.

याबाबत सविस्तर बातमी अशी की,दहिफळ येथील तरुण रोहण राजेंद्र भातलवंडे हा सुशिक्षित तरुण आहे.१० वी पर्यंत शिक्षण झाले असून त्याने कृषी पदविका डिप्लोमा कोर्स केला आहे.नोकरीच्या शोधात फिरला परंतु कुठे नोकरीची संधी मिळाली नाही.
गावात दुधडेअरीचा व्यवसाय सुरू केला.दुधाचा व्यवसाय चालवत असताना स्वतः च्या तीन गायी सांभाळत होता.
दुधाचे दर कमी-जास्त होत होता.या व्यवसायात नफा कमी तोटा अधीक होत आहे हे लक्षात आले.आपण कृषी पदविका शिक्षण घेऊन काय फायदा झाला.कुठे नोकरीची संधी उपलब्ध होत नाही.जर आरक्षण असते तर कुठंतरी संधी मिळाली असती.तो सतत आपल्या विचारात एकांतात वावरत होता.
दहिफळ येथे दि ३ जानेवारी रोजी मराठा आरक्षणासाठी बैठक घेण्यात आली होती.आरक्षण मिळवण्यासाठी मनोज जरांगे पाटील जीवाची बाजी लावत आहेत.अखेरची लढाई सुरू आहे.सरकारने लवकर आरक्षण जाहीर करावे यासाठी दबाव वाढत आहे.आंदोलने होत आहेत.सकल मराठा समाज एकवटला आहे.आझाद मैदानावर २० जानेवारी रोजी जरांगे पाटील उपोषणाला बसणार आहेत.त्यांच्या पायी दिंडीत सहभागी होण्यासाठी गावात बैठक घेऊन जाण्याचा निर्णय घेतला आहे.सर्व तयारी झाली आहे.
बैठकीच्या दुसऱ्या दिवशी सायंकाळी दुःखद घटना घडली आहे.मराठा आरक्षणासाठी मी बलीदान देत आहे.सरकारने जागे व्हावे व मराठ्यांना आरक्षण जाहीर करावे असा मजकूर लिहून रोहण राजेंद्र भातलवंडे याने गळफास घेऊन जीवन संपविले आहे.
एकीकडे आरक्षणासाठी जोरदार आंदोलन सुरू आहे.तर युवक हताश होऊन गळफास घेऊन आत्महत्या करत आहेत.
सरकारचे अपयश आहे.तरुणांना पुरक व्यवसायासाठी आर्थिक मदत देण्यास कमी पडले आहे.शिक्षण घेऊन सुशिक्षित बेकार म्हणून फिरावे लागत आहे.हताश होऊन अनेक तरुण युवक आपले जीवन संपवित आहेत.
मराठा आरक्षणासाठी दहिफळ येथील पहिला बळी गेला आहे.
दि.४ जानेवारी रोजी सायंकाळी सातच्या सुमारास रोहण राजेंद्र भातलवंडे याने चिठ्ठी लिहून गळफास घेतला आहे.
गायीचे दूध काढून चिठ्ठी लिहून आपले जीवन संपविले आहे.ही घटना परिसरात कळाली सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
येरमाळा पोलिस स्टेशनमध्ये दत्ता नानासाहेब भातलवंडे यांनी फिर्याद दाखल केली असून घटनेची माहिती मिळताच बीट अंमलदार प्रकाश चाफेकर, हेडकॉन्स्टेबल सुर्यजीत कदम, तंटामुक्ती अध्यक्ष तात्या भातलवंडे , पोलिस पाटील मनेश गोरे, सरपंच चरणेश्वर पाटील ,एपी आय जाधव यांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला.
रात्री प्राथमिक आरोग्य केंद्रात पोस्टमार्टम डॉ राऊत यांच्या उपस्थितीत करण्यात आले.तसेच प्रेत कुटुंबाच्या हवाली केले.राजेंद्र भातलवंडे यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी गावकरी नातेवाईक उपस्थित होते.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.