रोजच्या सरावाने माणसाला यश मिळतेच — तहसीलदार शिवानंद बिडवे

विद्यार्थ्यांनी रोजचे नियोजन करून थोडा थोडा सराव वाढविला तर परिक्षेत चांगले यश मिळतेच असे प्रतिपादन येरमाळा पत्रकार संघाच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केले
6 जानेवारी पत्रकार दिनानिमित्त येरमाळा पत्रकार संघाच्या वतीने शालेय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.त्या स्पर्धेतील विजेत्यांच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिन बारकुल होते,तर धाराशिवचे तहसीलदार शिवानंद बिडवे, बीडचे तहसीलदार सुहास हजारे,जीएसटी ऑफीसर दयानंद बिडवे, येरमाळा पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अतुल पाटील,आयुष व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक डॉ.संदीप तांबारे,यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना तहसीलदार शिवानंद बिडवे म्हणाले की, एक ध्येय समोर ठेवून दररोज सकाळी दिवसांच्या अभ्यासाचे नियोजन करून थोडा थोडा वेळ वाढवत.चिकाटीने अभ्यास केला तर परिक्षेत चांगले यश मिळतेच अशीच सवय कायम केली की आयुष्यात काहीही कमी पडत नाही जीवन यशस्वी बनते.तहसिलदार सुहास हजारे म्हणाले की, शिक्षणाचा पाया हा चांगले संस्कार असून इतरांसोबत चांगले वागावे नेहमी सहकार्य करण्याची वृत्ती ठेवावी, जीएसटी ऑफीसर दयानंद बिडवे यांनी विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच मैदानी खेळात सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले,एपीआय अतुल पाटील यांनी वाहतूक सुरक्षेविषयी माहिती दिली,तर डॉ.संदीप तांबारे यांनी व्यक्तिमत्त्व विकासासाठी काय चांगल्या सवयी असाव्यात याविषयी माहिती दिली, यावेळी स्पर्धेतील विजेते विद्यार्थ्यांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले, कार्यक्रमात ज्ञानोद्योग विद्यालय, सरस्वती विद्यालय व विद्यानिकेतन इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.कार्यक्रमाचे प्रास्ताविक दत्ता बारकुल, सुत्रसंचलन सतिश बावळे, शेवटी आभार लहू बारकुल यांनी मानले, कार्यक्रम यशस्वीतेसाठी येरमाळा पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले,