रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत वाहनधारकांना रस्ते वाहतूक सुरक्षा संदर्भात मार्गदर्शन

येरमाळा (प्रतिनिधी):- १५ जानेवारी ते १४ फेब्रुवारी या रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत महामार्ग व आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत येडशी टोल नाक्यावर वाहधरकांना वाहनांना अचानक आग लागल्यास काय करावे आग आटोक्यात कशी करता येईल या बाबत प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.
दर वर्षी महामार्गपोलीस शाखेच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत विविध उपक्रम घेण्यात येतात यात वाहनधारकांना रस्ते वाहतूक सुरक्षा,चालक,वाहनधारक यांच्या आरोग्य तपासणी,डोळ्यांची तपासणी,अपघात,आकस्मित उदभवणाऱ्या प्रसंगाला काय उपाय योजना कराव्या लागतात या बाबत मार्गदर्शन केले जाते.
यावर्षी येडशी (धाराशिव) महामार्ग पोलीस शाखेच्या वतीने येडशी टोल नाका या ठिकाणी वाहनांना अचानक आग लागल्यास करावयाच्या उपायोजना संदर्भात धाराशिव येथील अग्निशमन दलाचे कर्मचारी व आपत्ती व्यवस्थापन समितीचे अधिकारी यांनी वाहन धारकांना,चालकांना वाहनांना अचानक आग लागली तर आग लागून होणाऱ्या वित्त,जीवित,हानी पासून कसे सुरक्षित राहता येईल अशा प्रसंगात आग आटोक्यात आणण्यासाठी काय उपाय योजना कराव्या या बाबतचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.वेळी साळुंके सर यांच्या मार्गदर्शनाखाली आग्निशामक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी प्रतक्षिक सादर केले.सदरील महामार्गा पोलीस शाखा धाराशिव चे कर्मचारी व तसेच आय आर बी टोल नाका येथील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.या वेळी टोल नाक्यावर मोठ्या संख्येने वाहनधारक उपस्थित होते.