ताज्या घडामोडी

येरमाळ्यात मल्हार पाटील यांची जबरदस्त जाहीर सभा

जेव्हा पासून अर्चनाताई पाटील यांना उमेदवारी मिळाली आहे तेव्हाच विरोधकांनी आपला पराभव स्वीकारल्याने घराणेशाहीच्या नावाखाली आगडोंब उसळीवला आहे.असे विधान मल्हार पाटील यांनी केले.
येरमाळा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रिपाइं, महायुती गटाच्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांच्या प्रचारार्थ मल्हार पाटील जाहीर सभा झाली या सभेचे अध्यक्षस्थानी आबासाहेब बारकुल होते यावेळी तालुकाध्यक्ष अजित पिंगळे पंडितराव टेकाळे, भगवान ओव्हाळ, विकास बारकुल, मदन बारकुल, जाफर शेख, खंडेराव मैदाड, यांची प्रमुख उपस्थित होते, यावेळी बोलताना मल्हार पाटील म्हणाले की 2024 च्या लोकसभेसाठी महायुतीने अर्चनाताई पाटील यांना उमेदवारी दिली आहे यांना उमेदवारी मिळतात विरोधकांच्या पोटात दुखणे चालू झाले असून त्यांना पराभवाची जाणीव झाली आहे यामुळे ते सातत्याने घराणेशाहीचा विचार लोकांमध्ये पेरत आहेत त्यांना हे माहित आहे की त्यांच्याच पक्षाच्या वरिष्ठ स्तरावर घराणेशाहीच आहे याची जाणीव ते विसरून केवळ पद्मसिंह पाटील यांना नावे ठेवणे असे बालिशपणे बोलने हेच त्यांना जमत आहे जे खासदारांनी काय कामे करावीत याची जाणीव नसलेला खासदार असल्याने जिल्ह्याचा विकास झाला नाही आता तो पूर्ण होण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांनी अर्चनाताईचे नाव सुचवले असून मोदी साहेबांना पाठिंबा देण्यासाठी अर्चना ताईच्या पाठीमागे खंबीरपणे साथ द्यावी अशी विनंती ही उपस्थित मतदार बंधूंना त्यांनी केली कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी जि प सदस्य मदन बारकुल यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपसरपंच गणेश बारकुल यांनी केले

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.