ताज्या घडामोडी

तेरा लाखांहून अधिक भाविकांनी वाहिली येडाईच्या पालखीवर चुनखडी

श्री येडेश्वरी देवीची चैत्र पौर्णिमेची यात्रा मोठ्या प्रमाणात भरली असुन देवीच्या यात्रेचा चुना वेचण्याचा मुख्य कार्यक्रम मोठया उत्साहात पार पडला या कार्यक्रमासाठी राज्यासह बाहेर राज्यातील तेरा लाखांच्या वर भाविक येरमाळा नगरीत दाखल झाले .येडेश्वरी देवीची पालखी मंदिरावरुन चुन्याच्या रानात येताच लाखों भाविकांनी चुनखडीचे खडे वेचुन नैवेद्यासह पालखीवर टाकत आई राजा उदो उदोच्या गजराने चुन्याच्या रानाचा परिसर दुमदुमून गेला होता.
आज सकाळी .येडेश्वरी देवीची पालखी डोंगरावरील मंदिरातुन आमराई मंदिराकडे हालगी, जाझं,संबळाच्या गजरात वाजत गाजत निघाली.मुख्य चुन्याच्या रानात पालखी .येताच भाविकांनी आई राधा उदे उदे,येडुसरीचा उदे उदेच्या जयघोष करताच चुन्याच्या रानाचा परिसर भाविकांच्या गजराने दणाणून निघाला. चुना वेचण्याचा कार्यक्रम यात्रेचा मुख्य कार्यक्रम मानला जातो यावेळी आ.राणाजगजितसिंह पाटील, ओमराजे निंबाळकर, मनोज जरांंगे पाटील, यांच्यासह भाविकांच्या पिढ्यान पिढ्या चालत आलेली प्रथा असल्याने मजूर,शेतमजूर,बिगारी,चाकरमाने कर्मचारी,लहान मोठे व्यावसायिक, व्यापारी,भाविक राज्यभरातून न चुकता दरवर्षी चुना वेचण्यासाठी दाखल होतात.काळानुरुप या यात्रेला येणाऱ्या भाविकांची संख्या प्रतिवर्षी वाढतच आहे. श्री येडेश्वरी देवीची यात्रेला राज्यातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी यात्रा असा मान प्रशासन स्तरावर आल्याने यात्रा पार पाडण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनावर आली आहे.
पोलीस यंत्रणेचे काम समाधानकारक
श्री येडेश्वरी चैत्र यात्रेत भाविकांची गतवर्षीपेक्षा यावर्षी संख्या मोठी असतानाही पोलिसांनी मात्र यावेळी चोख बंदोबस्त लावल्याने कुठल्याही प्रकारचा अनैतिक घटना घडली नाही तर थोडाफार ट्राफिकचा प्रश्न निर्माण झाला तरीही तो ताबडतोब सोडवण्यात पोलिसांना यश आले

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.