ताज्या घडामोडी

जातीयवादी शक्तीना रोखणे हा भारत जोडो अभियानाचा उद्देश – ललित बाबर

जयनारायण दरक / कळंब

– देशामध्ये आणि महाराष्ट्रात सत्ताधाऱ्याकडून संविधान आणि त्यातील अधिकार नाहीसे करण्याचा घाट घातला जात असून नव्याने पुन्हा मनुस्मृती लागू करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
छत्रपती शिवराय,महात्मा ज्योतिबा फुले,छत्रपती राजश्री शाहू महाराज,विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, माता जिजाऊ, अहिल्यादेवी होळकर, माता सावित्री यांच्या विचारांची सत्ता आणने, प्रत्येक लोकसभा मतदारसंघातून भारत जोडो अभियानचे किमान शंभर स्वयंसेवक प्रशिक्षित करून धर्मांध आणि जातीयवादी शक्तींना सत्तेपासून दूर ठेवणे हा भारत जोडो अभियानचा प्रमुख उद्देश असल्याचा ठाम विश्वास स्वराज इंडियाचे महाराष्ट्र अध्यक्ष ललित बाबर यांनी जिल्हास्तरीय मेळाव्यात व्यक्त केला.
धाराशिव येथील शासकीय विश्रामगृहात भारत जोडो अभियानचा जिल्हास्तरीय मेळावा दिलीप गणेश यांच्या अध्यक्षतेखाली दि.११ ऑक्टोबर २०२३ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
दोन सत्रातील या मेळाव्यात महाराष्ट्र लोकविकास मंचचे राष्ट्रीय अध्यक्ष विश्वनाथ तोडकर यांनी भाजपा सरकार सर्वच क्षेत्रात खाजगीकरण करून आरक्षण संपवून एस. सी,एस.टी,ओबीसीचे खच्चीकरण करत असल्याने यांना रोखण्यासाठी हिच योग्य वेळ असल्याने देशपातळीवरील सामाजिक संस्था व विविध संघटना एकत्र येवून भारत जोडो अभियान हि चळवळ सुरू केली असल्याचे सांगितले. भटक्या-विमुक्तांचे नेते प्रा.सुधीर अनवले यांनी स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांत सुद्धा आढरा पगड जातीमधील पारंपारिक कलावंताची विषमता दूर झाली नसून अन्न-वस्त्र- निवारा या मूलभूत गरजा पूर्ण झाल्या नाहीत हि शोकांतिका असून भारत जोडो अभियान शेवटच्या घटकापर्यंत पोहोचत असल्याचे सांगितले.
जेष्ठ नागरिक संघाचे जिल्हाध्यक्ष महादेव महाराज आडसूळ यांनी ज्येष्ठ नागरिकांचे समस्या मांडल्या.भारत जोडो अभियानाचे नेते प्रा.अर्जुन जाधव यांनी लोकसभा व विधानसभा मतदारसंघातून भारत जोडो अभियानचे स्वयंसेवक प्रशिक्षित करून इंडिया आघाडीस पूरक असे काम करणार असल्याचे सांगितले. अध्यक्षीय समारोपातून दिलीप गणेश यांनी पुरोगामी विचारांच्या कार्यकर्त्यांना भारत जोडो अभियान चळवळ गतिमान करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.तीन तास वैचारिक मंथन सुरू असलेल्या मेळाव्याचे प्रास्ताविक करतानी स्वराज इंडियाचे जिल्हाध्यक्ष सुभाष घोडके यांनी बेरोजगारी,महागाई, शेतकरी,शेतमजूर,बांधकाम कामगार,ऊसतोड कामगार, सफाई कामगार,आणि इतर सर्व रोजंदारीवर काम करणाऱ्याचे दैनंदिन प्रश्न आ वासून बसले असताना भाजपा सरकार आरक्षण बंद करून खाजगीकरण करून बहुजनांची मुस्कटदाबी करत असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस छत्रपती शिवराय,महात्मा ज्योतिबा फुले,राजश्री शाहू महाराज,विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. शेवटी संविधानाप्रती असलेली प्रतिज्ञा देवून मेळाव्याची सांगता करण्यात आली. मेळाव्याच्या प्रथम सत्राचे सूत्रसंचालन प्रा.अविनाश घोडके यांनी केले व आभार स्वराज इंडिया कळंब शहराध्यक्ष माधवसिंग राजपूत यांनी मानले. दुसऱ्या सत्राचे संचलन बंडू ताटे यांनी केले तर आभार अँड.बाबासाहेब वडवे यांनी मांनले.
या मेळाव्यासाठी सतिश घोगरे,बाबुराव शिंदे, यशवंत पेठे,शाम तोडकर, ज्ञानेश्वर वडवराव, प्रल्हाद पांचाळ,नवनाथ भंडारे,उपगुप्त वाघमारे,संजीव आगळे, हनुमंत तौर,बाबासाहेब बनसोडे,गोपाळ सरवदे, उमाजी देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती.
हा मिळाला यशस्वी करण्यासाठी स्वराज इंडियाचे कळंब तालुकाध्यक्ष अंगद टेकाळे, मराठवाडा मुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुरेश शेळके, स्वराज्य इंडियाचे मंगरूळ गट प्रमुख अर्जुन बनसोडे,विजय गायकवाड यांनी परिश्रम घेतले.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.