ताज्या घडामोडी

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जुन्यासंसद भवना समोरील काढण्यात आलेला पूर्णाकृती पुतळा परत नवीन संसदभवना समोर बसविण्यात यावा

धाराशिव प्रतिनिधी:- लोकसभा चालू नसताना मंत्रिमंडळ अस्तित्वात असताना आपल्या जुन्या संसदेसमोरील भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा लोकसभा सचिवालयाने मंत्रिमंडळाच्या संमतीशिवाय जुन्या संसद भवनासमोरल हटवून इतर ठिकाणी स्थलांतरित केला असल्याने संपूर्ण आंबेडकरी जनतेच्या भावना दुखावल्या आहेत तरी परत नवीन संसदभवना समोर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ऐतिहासिक पूर्णाकृती पुतळा बसवण्यात यावा अशी मागणी धाराशिव जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटना,राजकीय पक्ष, च्या वतीने जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी यांच्यामार्फत मा.श्रीमती राष्ट्रपती महोदया द्रोपदी मुर्मु व भारताचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

यावेळी निवेदनात म्हटले आहे की,अनेक राष्ट्रीय महापुरुषांचे पुतळे एकाच ठिकाणी स्थलांतर करण्यात आल्याचे सांगण्यात आले या स्थळांना प्रेरणास्थळ असे गोंडस नामाभिधान करण्यात आले आहे.
लोकसभेचे मावळते अध्यक्ष मा.ओम बिर्ला यांनी या प्रकाराचा सरकारशी काहीही संबंध नाही असे स्पष्टीकरण दिले आहे. तमाम जनतेच्या संवेदनशील भावनांशी अतूट संबंध असलेल्या पुतळ्यांचे लोकसभा सचिवालयाने स्थलांतरित करण्याचा निर्णय घेऊन तमाम भारतीयांच्या भावना पायदळी तुडविल्या आहेत. हा निंद्य प्रकार संसदेचा.मंत्रिमंडळाचा भारतीय संविधानाचा अवमूल्यन करणारा आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर लिखित भारतीय संविधानानुसार ज्या संसदेचे कामकाज चालते त्याच संसदेसमोरील संसद भवनाकडे अंगुली निर्देश केलेला भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळ्याचे अतूट नाते आहे.केंद्र सरकारने आधुनिकीकरणाच्या नावाखाली नवी दिल्ली येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या निवासाचे मूळ स्वरूप नष्ट केले आहे.आता संसदेसमोरील पुतळा स्थलांतरित केला आहे जो पुतळा राष्ट्रीय नेत्यांच्या हस्ते व उपस्थितीत उभारण्यात आला होता सदर पुतळ्यास देशातील व परदेशी पर्यटक श्रद्धेने भेट देऊन अभिवादन करतात. साहजिकच या स्थळास वेगळे पावित्र्य निर्माण झाले होते सदर पुतळा स्थलांतर केल्यामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या एकनिष्ठ अनुयायांच्या भावना दुखावल्या आहेत आणि हा निंद्य प्रकार जाणीवपूर्वक केला गेला आहे. असे आमचे ठाम म्हणणे आहे केंद्र शासनातील वरिष्ठ मंत्र्यांच्या सूचने शिवाय हे पुतळे स्थलांतर करण्याची कार्यवाही अशक्य आहे केंद्र शासनातील वरिष्ठ नेत्यांना सामाजिक धार्मिक व राजकीय दृष्ट्या ज्यांच्याबद्दल प्रेम नाही अनास्था व द्वेष आहे अशाच महापुरुषांचे पुतळे हटविले गेले आहेत हे नाकारता येत नाही या निंदनीय प्रकाराची संसदीय सदस्य समितीमार्फत चौकशी व्हावी व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह सर्व महापुरुषाचे पुतळे नवीन संसद भावना समोर तात्काळ बसविण्यात यावेअशी मागणी करण्यात आली आहे यावेळी निवेदनावर रिपाइं (खरात) पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत, कास्टट्राइब कर्मचारी कल्याण महासंघाचे अतिरिक्त सचिव हरिभाऊ बनसोडे, अरुणकुमार माने, साहित्यिक विजय गायकवाड, राहुल जगताप,सुनील वाघमारे, भाऊसाहेब अंदुरकर,दयानंद बनसोडे,सुधाकर मस्के,संपत सरवदे, परमेश्वर गायकवाड, धनंजय नाईकवाडी, सुहास सरवदे, यांच्यासह अनेक सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या स्वाक्षरी या आहेत

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.