धाराशिव येथील उपोषण कर्त्यांची प्रकृती खालावली ! अशंत: अनुदानित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागण्यासाठी धाराशिव येथे सहा दिवसांपासून आमरण उपोषण सुरूच !!

तेरणा काठ न्यूज (धाराशिव)
अंशत: अनुदानित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासाठी धाराशिव येथे गेल्या सहा दिवसांपासून आमरण उपोषणाचे सत्र सुरूच असून, उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली असल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातील समस्याग्रस्त अंशत: अनुदानित शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात असल्याचे सांगितले जात आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे की, महाराष्ट्रातील एकूण ६५ हजार अंशतः अनुदानित शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रचलित प्रमाने दि.०१ जानेवारी २०२४ पासून प्रती वर्षी विना अट पुढील टप्पा अनुदान देण्यात यावे. विशेष करून या मागण्यांची पूर्तता विधानसभा निवडणुकांच्या आचारसंहिता पूर्वी किमान एक महिन्यांचा वाढिव पगार शिक्षकांच्या बॅंक खात्यात जमा करावा. या मागणीसाठी खासगी प्राथमिक, माध्यमिक उच्च माध्यमिक, शिक्षक समन्वयक संघातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संपूर्ण महाराष्ट्रात दि.१९ जुलैपासून लाक्षणिक धरणे आंदोलन व दि.२२ जुलैपासून धाराशिव व परभणी जिल्ह्यातील पाथरी येथे अन्न त्याग आंदोलन सुरू करण्यात आले आहे. दि.९ नोव्हेंबर २०२३ रोजी शिक्षणमंत्री डॉ. दीपक केसरकर यांनी राज्यस्तरीय आंदोलनास भेट देऊन दि.१२ जुलै २०२४ रोजी दि.०१ जून २०२४ पासून टप्पा वाढ अनुदान देणार व हिवाळी अधिवेशनात त्याची तरतूद करण्याची ग्वाही दिली होती. मात्र त्याची पूर्तता अद्याप पर्यंत करण्यात आली नसल्याने प्रा. भाऊसाहेब खिचडे, प्रा. महादेव गपाट, प्रा. भैरवनाथ सोकांडे, प्रा.गुरमे यांच्यासह अन्य समस्याग्रस्तांनी सांगितले.
उपोषण स्थळी आमदार राणाजगजितसिंह पाटील, आमदार कैलास पाटील, नितीन काळे, सक्षणा सलगर यांनी भेट दिली. यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील व नितीन काळे यांनी वरीष्ठ पातळीवरील नेत्यांची भेट घेऊन प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.