नगदी पिकांच्या खर्चाने यंदाही शेतकऱ्यांचा हात मात्र राहणार रिकामाच

तेरणा काठ न्युज
बऱ्याच वर्षानंतर मृग नक्षत्रात चांगला पाऊस झाल्याने खरीपाची पेरणी मृग नक्षत्रात झाली. वेळेवर पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन बियांच्या पिशव्या तसेच मोठ्या प्रमाणात खत खरेदी करून ट्रॅक्टर द्वारे पेरणी केली एकरी जवळपास 25 हजाराचा खर्च रानात करून पीक उभं केलं परंतु आसामानी सुलतानीच्या फेऱ्यात अडकलेल्या शेतकऱ्याच्या नशिबी पुन्हा एकदा हात रिकामाच राहणार असल्याचे चित्र आहे .हाती पडलेला घास पदरी पडण्यासाठी शेतकरी जिवाचं रान करताना दिसत आहे जवळपास महिना उलटून गेला मात्र ऊन नाही ढगाळ वातावरणामुळे सोयाबीन पिकांस हव्या तेवढ्या शेंगा लागल्या नाहीत शेत हिरवेगार दिसत आहे परंतु उत्पादनात मोठ्या प्रमाणात तूट येणार असल्याचे दिसत आहे त्यासोबतच सततच्या पावसामुळे सोयाबीन या पिकात मोठ्या प्रमाणात तणं वाढल्याने मजूर महिलांची हजेरी तीनशे रुपये पार झाली आहे तरीही तग धरून असणारा शेतकरी पीक चांगले राहावे म्हणून पुन्हा सावकारी कर्ज काढून शेतीची कामे करतच आहे
जून पासून ऑगस्टपर्यंत सतत पाऊस पडल्यामुळे तब्बल वीस वर्षानंतर तेरणा नदी चार वेळेस वाहिली असे अनेक वर्षांनंतर झाले असल्याचे जुने जाणकार सांगत आहेत यंदा मात्र ढगाळ वातावरण आणि पाऊस यामुळे पिके वाढली परंतु त्याला लागणारे शेंगा मात्र तेवढ्या लागले नाहीत त्यामुळे उतार मिळणार नसल्याने शेतकरी पुन्हा चिंतेत असुन खर्च झालाय एवढेही उत्पादन पदरी पडणार नसल्याचे दिसून येत आहे त्यातच पिकावर यंदा रोगाने चांगलेच थैमान घातले आहे अख्या खरीप हंगामात एक ते दोन वेळेस फवारणी करावी लागत होते परंतु यावर्षी मात्र चार ते पाच वेळेस शेतकरी फवारणी करताना दिसत आहेत तरीही उत्पादनात वाढ नाही घटच होणार असल्याचे चित्र आहे
खरीप हंगाम हा नगदी पिकाचा हंगाम असतो यावरच शेतकऱ्यांचे वार्षिक बजेट अवलंबून असते परंतु या वार्षिक बजेट मध्ये यंदा निसर्गाचा कोप झाल्याने उत्पादन घटणार आणि पुन्हा एकदा सावकाराकडे शेतकऱ्याला जावं लागणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.