येरमाळ्यात चोरांचा डाव फसला असला तरी पोलिसांच्या पुढे चोरट्यांना अडवण्याचे असणार आव्हान

तेरणा काठ न्युज
येरमाळा पोलीस ठाण्यात अंतर्गत येणाऱ्या गावाचा आतापर्यंतचा इतिहास सांगतो की गणेश चतुर्थी नंतर येणारा लक्ष्मी सण आला की चोऱ्या करण्याच्या प्रयत्नात चोरटे सक्रिय असतात याची गतवर्षीची खबर पोलीस ठाण्यात असताना देखील पोलिस सतर्क असल्याचे दिसत नाही.
सालाबादप्रमाणे गणेश स्थापना झाली की घरोघरी लक्ष्मी येतात आणि याचकाळात येरमाळा परिसरात चोरीच्या प्रमाणात वाढ होते चोरटे सक्रिय होतात या दिवसात रात्रीची गस्त वाढवण्याची गरज असताना देखील पोलीस मात्र नेमकं कोणत्या कामात आहेत हे मात्र समजत नाही कारण दिं. 4 सप्टेंबरच्या रात्री म्हणजे गौरी गणपतीच्या अगोदरच येरमाळा गावात तुरटी सक्रिय झाले असून रात्री बांगर किराणा दुकानाचे शटर तोडण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला अचानक त्या ठिकाणी एक रिक्षावाला आल्याने तो प्रयत्न फसला पुढे चोरटे बस स्थानकात गेले या ठिकाणी असणाऱ्या मोबाईल शॉप वर चोरी करण्याचा प्रयत्न केला परंतु तोही प्रयत्न त्यांचा फसला पुढे चोरटे तसेच चौकात आले आणि चौकात आल्यानंतर बिअरबार जवळपास फिरले. याची पाहणी करून चोरटे गायब झाले. याबाबत गावातील एका रिक्षावाल्याने पाहिल्याने चोरटे त्याठिकाणाहून पळून गेले परंतु यानंतरही गावात व परिसरात चोरटे सक्रिय होणार असल्याचे चित्र दिसत आहे यासाठी पोलिसांनी सतत सतर्कता बाळगणे आवश्यक असले तरी पोलीस मात्र याबाबत गांभीर्याने घेत नसल्याचे बोलले जात आहे आता यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच याकडे लक्ष देऊन गावातील गोरगरिबांच्या घरातवर होणारे चोरीच्या अत्याचाराकडे लक्ष देऊन त्वरित उपाययोजना राबवावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांतून होतांना दिसत आहे.