धाराशिव कळंब विधानसभा मतदारसंघाची ख्याती :: देणार नव्या उमेदवाराला संधी

तेरणा काठ वृत्तसेवा
धाराशिव कळंब विधानसभा मतदारसंघ हा मुळ शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या मतदारसंघात अनेक वेळा शिवसेनेचाच उमेदवार निवडून आला आहे आता मात्र या शिवसेनेत दुफळी निर्माण झाली असून उद्धव ठाकरे गट व एकनाथ शिंदे गट निर्माण झाला आहे यातच मतदार नेमकी कोणती भूमिका घेणार हा प्रश्न महत्त्वाचा भाग आहे
सध्या विधानसभेची रणधुमाळी चांगलीच पेटली असून आता प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत एकीकडे बाण आहे तर दुसरीकडे मशाल आहे यात मतदार कोणाला मत देणार हे येणाऱ्या निकालाच्या तारखेस समजणार आहे.यामध्ये महाविकास आघाडीमध्ये खोक्याच्या मोक्यावर लाथ मारून परत आलेले विद्यमान आमदार कैलास पाटील यांनाच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पसंती दिली तर महायुती मध्ये जुना शिवसैनिक अजित पिंगळे यांना उमेदवारी दिली आहे पूर्वी कळंब वाशी मतदारसंघ हा पूर्णपणे शिवसेनेचा बालेकिल्ला होता. मतदार संघाची पुनर्रचना झाली आणि कळंब तालुका हा धाराशिव मतदारसंघाला जोडला गेला. तसं पाहिलं तर धाराशिवचे वर्चस्व या मतदारसंघावर राहिले आहे परंतु प्रत्येक वेळेस नवख्या उमेदवारांना संधी देणे तोच पॅटर्न धाराशिव कळंब मतदारसंघातही राबवला गेला आहे गतवर्षी विद्यमान आमदार नवनिर्वाचित म्हणून आलेले कैलास पाटील यांना जनतेने संधी दिली पाच वर्ष त्यांनी धाराशिव कळंब या मतदारसंघाचा कारभार पाहिला स्वतःची इमेज राखण्यात ते यशस्वी झाले असले तरी मतदारसंघाची परंपरा अशी सांगते की नवखा उमेदवार समोर आला की लोक त्यांना लाईक करतात यातच जुना शिवसैनिक व नवखा उमेदवार अजित पिंगळे आल्याने प्रचाराच्या रणधुमाळीत मोठ्या प्रमाणात टस्सल झाली. कोण विजयी होणार याबाबत प्रत्येक मतदाराच्या मनात शंका निर्माण झाली अजित पिंगळे सारख्या नवख्या उमेदवारांनी ही प्रचाराचा गड चांगलाच पेटवला. विद्यमान आमदार कैलास पाटील यांची चांगलीच दमछाक केली. प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून लवकरच मतदान होणार आहे दोन्ही उमेदवार शिवसेना पक्षाचेच असल्याने आता धाराशिव कळंब मतदारसंघ हा जुनी परंपरा कायम राखतो की विद्यमान आमदार कैलास पाटील यांना संधी देतो की नवखा उमेदवार अजित पिंगळे यांना संधी देतो हे येणाऱ्या काळातच पाहावयास मिळेल.