येडेश्वरी देवी चैत्र यात्रा तयारी :: नियोजन बैठक 17 मार्च रोजी

तेरणा काठ वृत्तसेवा
चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला अत्यंत उन्हाच्या तडाख्यात उघड्यावर भरणारी जत्रा म्हणून अख्या महाराष्ट्रात येरमाळ्याच्या श्री येडेश्वरी देवीची जत्रा प्रसिद्ध आहे वीस लाखाहून अधिक भाविक या जत्रेस येत असल्याने प्रशासनावर त्यांच्या सोयी सुविधांचा प्रश्न मोठा असतो. परंतु प्रशासकीय स्तरावर कसलेही गांभीर्याने घेतले जात नसल्याचे आजपर्यंत दिसून आले आहे.
केवळ ग्रामपंचायत स्तरावरच या जत्रेची तयारी करण्यात येते. यास कसलाही शासकीय निधी उपलब्ध नाही या जत्रेस अठरा पगड जातीचे लोक येत असतात त्यामुळे प्रशासनाकडून भाविकांच्या सोयी सुविधा व्हाव्यात अशी माफक अपेक्षा भाविकातून होत असते . येणारा भाविका एसटी बसणे किंवा टमटमने येणार असल्याने तो उघड्यावर किंवा जशी परिस्थिती असेल तसा तो राहतो आई येडेश्वरीचा भावीक हा चारचाकीचा नसल्याने या ठिकाणी सोयी सुविधांचा मोठा अभाव आहे. अजूनही रस्त्याची दुरावस्था जशीच्या तशीच आहे केवळ नादी लावण्याचा कार्यक्रम प्रशासनाकडून होत असतो रस्त्यामुळे भाविकांची बेहाल होणार आहेत कारण खड्ड्यात रस्ते की रस्त्यावर खड्डे हेच समजून येत नाही. लवकरच उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली यात्रा नियोजन बैठक पार पडणार आहे या बैठकीत भाविकांच्या सोयीसुविधा विषयी चांगल्या प्रकारे चर्चा व्हावी व या चर्चेमधून निर्माण झालेल्या सोयी सुविधांची योग्य ती कारवाई व्हावी व भाविकांना याचा लाभ घेता यावा.
यंदा पाऊस पाणी चांगले झाले असले तरी फेब्रुवारी महिन्यातच पाण्याची पातळी खाली गेलेली आहे येरमाळा परिसरातील विहिरी व बोअरचे पाणी सध्या खूप कमी झाल्याने येणाऱ्या भाविकांसाठी पाण्याची व्यवस्था करणे हे शासनापुढे मोठे आव्हान असणार आहे. मंदिर परिसरात देवस्थान ट्रस्ट कडून डोंगरावर पिण्याची व्यवस्था करण्यात येते परंतु डोंगराखाली उघड्यावर मोठ्या प्रमाणात भाविक मुक्कामासाठी असल्याने टँकरद्वारेच त्यांना पाण्याची सोय उपलब्ध करून द्यावी लागते. प्रशासन स्तरावरून यासाठी अपेक्षित असणाऱ्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात जेणेकरून ग्रामपंचायत स्तरावर आलेल्या वाहनांचा व सोयी सुविधायुक्त वस्तूंचा वापर करता येईल व भाविकांची सोय करता येईल.