कल्याणस्वामी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था परंडा येथे शिवराज्याभिषेक दिन सोहळा संपन्न

तेरणा काठ वृत्तसेवा –परंडा – एकत्र कुटुंब पद्धतीतून महान भारत निर्माण होऊ शकतो असे प्रतिपादन मुख्य प्रवक्ते संजय कुलकर्णी यांनी कल्याणस्वामी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था परंडा येथे शिवराज्याभिषेक दिन सोहळा कार्यक्रमात केले.
कौशल्य विकास उद्योजकता आणि नाविन्यता विभाग महाराष्ट्र शासन आणि मंत्री माननीय मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य चिरीत्य साधून औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रशिक्षणार्थी यांना जीवनाची पंच परिवर्तन सूत्री यातून कल्याणस्वामी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था परंडा येथे आज कुटुंब प्रबोधन या विषयावर संजय कुलकर्णी यांचे मनोगताचे आयोजन दिनांक ०६ रोजी शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे प्राचार्य संतोष कदम हे होते तर प्रमुख वक्ते म्हणून संजय कुलकर्णी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्था व्यवस्थापन समिती चे सदस्य महावीर काशिद, खैरे बाप्पा, विशाल काशिद, हिमालय वाघमारे हे होते.
या कार्यक्रमात पुढे बोलताना संजय कुलकर्णी यांनी सांगितले की, जेवण आपण कुठेही करू शकतो पण भोजन मात्र आपण कुटुंबासोबतच करू शकतो. व्यसन सोडून, उच्च कार्य करून आपण ऊर्जावन भारत निर्माण करू शकतो. पुस्तक वाचनातून प्रेरणा मिळते, संपूर्ण जगात भारतातील कुटुंब व्यवस्था भक्कम मानली जाते. सर्वांनी समाजासाठी वेळ घ्यावा.
हा कार्यक्रम पार पडण्यासाठी संस्थेचे प्राचार्य संतोष कदम यांच्या मार्गदर्शनाखाली शिल्पनिदेशक रतिकांत पवार, नितेश फाळके, रामेश्वर जाधवर, कल्लेश भोसले, शुभम पाटील, शिल्पनिदेशिका महानंदा काळे, भाग्यश्री मोहरे, सुरेखा जाधव,वरिष्ठ लिपीक सुनील सोमवंशी , ऋषिकेश शिंदे यांच्यासह चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांनी केले यावेळी संस्थेतील प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.