ताज्या घडामोडी
निवडणूकीत दिलेल्या आश्वासनाकडे लक्ष वेधण्यासाठी उबाटा शिवसेनेच्या वतीने मुख्यमंत्र्यांना ग्रामपंचायत मार्फत निवेदन

तेरणा काठ वृत्तसेवा –कळंब तालुक्यातील येरमाळा येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी ग्रामपंचायत कार्यालयामार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.निवेदनामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते त्याचे काय झाले ?, वेळेत कर्जफेड करणाऱ्या शेतकयांना प्रोत्साहन अनुदान दिले गेले नाही ?, शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव सरकार देणार होते. एक रूपयात पीक विमा योजना का बंद केली? यासह अनेक मागण्याचे निवेदन येरमाळा ग्रामपंचायत कार्यालयामार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना देण्यात आले. यावेळी शिवसेना येरमाळा विभाग प्रमुख राहूल पाटील, शिवसेना नेते विलास थोरबोले,मनोज बारकुल,शरद बारकुल,मलारी कसबे, नागेश तोडकरी आणि शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.