ताज्या घडामोडी

कळंब पोलीस ठाण्यामध्ये नवीन कायद्याची जनजागृती

कळंब

भारतामध्ये एक जुलैपासून कायद्यामध्ये काही बदल झाले आहेत त्याविषयी जनजागृती करण्यासाठी कळंब पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रवी सानप यांनी पत्रकार व पोलीस पाटील यांना बोलवण्यात आले
यावेळी त्यांनी कायदे विषयी माहिती देताना एक जुलैपासून भारतीय न्याय संहिता (BNS), भारतीय नागरी सुरक्षा संहिता (BNSS), भारतीय पुरावा कायदा (BSA) हे तीन कायदे लागू झाले आहेत. म्हणजेच आयपीसीची जागा BNS, सीआरपीसीची जागा BNSS आणि आयईएची जागा BSAने घेतली आहे आश्या प्रकारे भारतीय न्याय संहितेत बदल करण्यात आले आहेत
नवीन कायद्यामध्ये ऑडिओ-व्हिडीओद्वारे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने गोळा केलेले पुरावे ग्राह्य धरले जातील तसेच एखादा गुन्हा नोंद झाल्यानंतर त्याचा तपास ठराविक कालावधी मध्येच पूर्ण करावा लागणार असल्याने नागरिकांचा न्यायपालिकेवरील विश्वास अधिक बळकट होईल यावेळी कळंब तालुक्यातील सर्व पोलीस पाटील पत्रकार ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते यावेळी कळम पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवी सानप व सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत कांबळे यांनी मार्गदर्शन केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा विशेष शाखेचे पोलिस आमलदार मायेंदे व सुहास चिडे शिवाजी राऊत हे कर्मचारी उपस्थित होते

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.