ताज्या घडामोडी
लाथाबुक्क्यांनी मारहाण:: रत्नापुरातील घटना

तेरणा काठ न्युज
– शिवाजी जाधवर, गणेश जाधवर व इतर 6 अनोळखी इसम यांनी दि. 29.08.2024 रोजी 22.30 वा. सु. येरमाळा ते बीड जाणारे एन एच 52 रोडलगत रत्नापूर शिवारातील चंदन बिअरबार येथे फिर्यादी नामे- अशोक बळीराम जाधवर, वय 30 वर्षे, रा. रत्नापूर ता. कळंब जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी मागील भांडणाचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी,काचेच्या बॉटलने मारहाण करुन जखमी केले. त्यावर फिर्यादीचा मित्र राजु जाधवर हे भांडण सोडवण्यास आले असता नमुद आरोपींनी त्यांनाही शिवीगाळ करुन मारहाण केली. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-अशोक जाधवर यांनी दि.30.08.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 118(1),115(2), 352, 351(2), 189(2), 190, 191(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.