गेल्या वर्षी दुष्काळ यावर्षी येरमाळा परिसरात बिबट्याचा वावराच्या भितीने हातची पिके वाया जाणार ?

तेरणा काठ वृत्तसेवा
धाराशिव जिल्ह्यात वाघ व बिबट्याचा वावर वाढला असून सध्या तो मलकापूर- येरमाळा परिसरात दिसून आल्याने परिसरातील शेतकरी घाबरला असून गेल्या वर्षी दुष्काळी परिस्थिती आणि यंदा बिबट्याचा वावर असल्याने शेतकऱ्याच्या शेती उत्पन्नात घट होणार आहे.
दिनांक 28 डिसेंबर रोजी मलकापूर परिसरात बिबट्याने वासराची शिकार केली ही बाब निदर्शनास आल्याने रात्री शेतात जाणे शेतकरी टाळत आहे सध्या लाईटची वेळ ही रात्रीची आहे त्यामुळे पिकांना पाणी देणे बिबट्याच्या भीतीमुळे शक्य नसल्याने पाणी असून लाईटच्या वेळेमुळे पिके पाण्याअभावी जळून जात आहेत. मलकापूर शिवारतून वाघ पुढे येरमाळा शिवारात आला आहे.त्याच्या त्याच्या पायाचे ठसे बापू घेवारे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या शेतात दिसून आले आहेत. बिबट्या हा मलकापूर शिवारतून हायवे ओलांडून येरमाळा येथील उपळाई साठवण तलावाच्या अलीकडील शेतातून बिबट्या हा पुढे उपळाई शिवारात गेला असल्याचे पायाच्या ठसावरुन अंदाज बांधला जात आहे.
लाईटची दिवसाची वेळ वाढवण्याची मागणी
बिबट्याच्या भीतीमुळे सध्या शेतकरी शेतात जाण्यास घाबरत आहे त्यामुळे पिकांना पाणी देणे याची गरज असताना सुद्धा रात्रीच्या वेळेमुळे चहाचे पीक जाते की काय अशी भीती निर्माण झाली असून महावितरण कंपनीने थ्री फेज दिवसाची वेळ वाढवण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.