पालखीवर होणार आहे हेलीकॉप्टरने पुष्पवृष्टी

तेरणा काठ वृत्तसेवा
अख्ख्या महाराष्ट्राला नवसाला पावणारी देवी म्हणून सुपरिचित असणारी येरमाळ्याच्या येडाईचा चैत्र महोत्सव येत्या 12 एप्रिल पासून सुरुवात होत असुन देवीची पालखी चुन्याचा रानात आल्यावर पालखीवर हेलीकाॅप्टरने पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे.
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री येडाई देवीची चैत्र पौर्णिमा यात्रा 12 एप्रील ते 17 एप्रिल या कालावधीत होणार आहे. चैत्र पौर्णिमा यात्रेला व देवीच्या पालखी सोहळ्यात चुना वेचून देवीच्या पालखीवर टाकण्याच्या कार्यक्रमासाठी राज्यभरासह बाहेर राज्यातून लाखोंच्या संख्येने भाविक येतात. हा आनंदाच्या क्षणांच्या वेळी एकमेकांच्या हातात नैवेद्य व पाच चुनखडी खडे देऊन देवीच्या पालखीवर टाकून देवीच्या यात्रेची वारी सेवा पूर्ण करतात. देवीची पालखी पुण्याच्या रानात आल्यानंतर या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे याही
आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्फत पालखीवर हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी करण्यात येणार असल्याचे माजी सभापती विकास बारकुल व उपसरपंच गणेश बारकुल यांनी सांगितले.